मुंबई (शाबीर शेख): गेल्या काही दिवसांपासून मनसेचे कार्यकर्ते मार खात असल्याने अस्वस्थ असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज आपल्या पदाधिका-यांची चांगलीच कानउघाडणी केली. नीट नियोजन करुनच आंदोलन करा, आता मार खाऊन याला तर पदावरुन काढन टाकेन, असा सज्जड दम राज यांनी भरला. यामुळे आता मनसे आणि फेरीवाल्यांतील संघर्ष अधिक गंभीर वळण घेणार असे दिसते. आना कता शासनाचा फेरीवाल्यांविरोधात आंदोलनात अशा मनसेच्या कार्यकर्त्यांना मारहाण होत आहे. आधी पश्चिम उपनगरांत आणि रविवारी विक्रोळीत मनसेच्या आंदोलनकर्त्या पदाधिका-यांना अ | मराठी लोकांकडून मारहाण झाली. | मराठी पाट्या दुकाने आणि | आस्थापनांवर लावण्याचा आग्रह धरणारे पत्र घेऊन विक्रोळीत मनसेचे कार्यकर्ते दुकाना-दुकानांत फिरत होते. त्यांच्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करुन जबर |मनसेचे अनेक कार्यकर्ते या तापक्रेते यामादियाला योगेर आतिः हल्यात जखमी झाले. या हल्यांमूळे अस्वस्थ असलेल्या राज यांनी आज विभागाध्यक्षांना कृष्णकुंज वर बोलावून घेतले होते. कोणतेही नियोजन नं करता अशी आंदोलने करु नका आणि आपापल्या विभागाच्या बाहेर जाऊ नका, असे सांगताना मनसे हा मार खाणा-यांचा पक्ष नाही, तर मार देणा-यांचा आहे. त्यामुळे यापुढे मार खाऊन याल तर पदावरुन काढून टाकेन, अशी समज देखील राज यांनी विभागाध्यक्षांना दिली. दरम्यान, अनधिकृत पेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंबंधीच्या हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत आणि त्यासोबत राज ठाकरे यांचे पत्र येत्या शुक्रवारपासून मनसेच्या पदाधिका-यांना दिले जाणार असून ही पत्रे पोलिस, महापालिका आणि रेल्वे अधिकायांना देण्यात येणार आहेत. फेरीवाल्यांविरोधात या यंत्रणेकडून होणा-या कारवाईवर नजर ठेवा, असेही राज यांनी विभागाध्यक्षांना बाजावले आहे.
मार खाल, तर पदाला मुकाल : राज